एका बलात्कार्‍याचा ‘कबुल’नामा, घटनेच्या वेळी नेमके कोणते ‘विचार’ असतात हे सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या वेळी बलात्कारासारखी एखादी घटना घडते, त्या वेळी अनेकांच्या मनात राग असतो आणि असतात असंख्य अनुत्तरित प्रश्न. प्रश्न हे की बलात्कारी नेमके कोण असतात ? त्यांचा हेतू काय असतो ? विचार काय असतो, कसे काय ते क्षणात राक्षस बनतात ? कसे काय कोणी अगदी मृतदेहापासून देखील आपली हवस भागवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचे असंख्य प्रश्न अनुत्तरित असतात.

ज्यावेळी संपूर्ण देश बलात्काऱ्यांच्या विरोधात रोष व्यक्त करत असतो आणि अशा आरोपीना जिवंत जाळण्याची मागणी करत असतो अशा वेळी बलात्काऱ्यांचे नेमकं काय म्हणणं आहे हे समजून घेणे देखील महत्वाचे असते, यामागे नेमका त्यांचा हेतू काय हे समजणे देखील गरजेचे आहे.

हा व्यक्ती अचानक राक्षस कसा काय झाला हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. तसेच अशी कोणती नशा आहे ज्यामुळे व्यक्ती आपल्या सर्व मर्यादा ओलांडतो ? त्यांच्या डोक्यात, मनात नेमके काय सुरु असते ? अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ एक बलात्कारीच देऊ शकतो.

हैद्राबाद येथे डॉक्टरच्या बलात्काराच्या आधी आजमगढ येथे एकाच कुटुंबातील तीन लोकांचा खून झाला होता. पती, पत्नी आणि त्यांच्या मुलाचा खून झाला होता आणि हे सर्व खुन्याने बलात्कारासाठी केले होते. रक्ताने माखलेल्या अवस्थेत आरोपीने महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिच्या लहान मुलीसोबत देखील जबरदस्ती केली.

त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आणि माहिती घ्यायला सुरुवात केली. आरोपीने त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी ऐकून पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. त्या आरोपीचा कबुलीनामा ऐकून, त्याला जिवंत राहण्याचा काही अधिकार आहे का ? असा सवाल उपस्थित होतो. एसएसपी त्रिवेणी सिंह यांनी सांगितले की आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणार.

त्या बलात्काऱ्याने ज्यावेळी पोलिसांशी बोलणे केले त्यावेळी चुकूनही पोलिसांनी तो माणूस आहे असे वाटले नाही. तो केवळ एखादे जनावर असल्यासारखा वागत होता आणि त्याला केवळ रक्ताची तहान आहे असेच पोलिसांना वाटत होते.

Visit : policenama.com