दिव्या भारतीच्या मृत्यूच्या 27 वर्षांनंतर साजिदची दुसरी पत्नी वर्धाचा मोठा ‘खुलासा’ ! म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री दिव्या भारती हिनं अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूनं साऱ्यांनाच धक्का बसला होता. दिव्यानं बॉलिवूडचे प्रोड्युसर डायरेक्टर साजिद नाडियाडवालासोबत लग्न केलं होतं. तिच्या मृत्यूनंतर साजिदनं वर्धा सोबत लग्न केलं. त्यांचंही लग्न खूप चर्चेत राहिलं होतं. आता दिव्याच्या मृत्यूनंतर आता 27 वर्षांनंतर वर्धानं दिव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

https://www.instagram.com/p/B_UvyHKpLAW/

वर्धानं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, “दिव्या आजही आमच्या आयुष्याचा भाग आहे. आज जेव्हा माझी मुलं तिचे सिनेमे पाहतात तेव्हा तिला मोठी मम्मी म्हणतात. साजिद आजही दिव्याच्या आईवडिलांना एका मुलाप्रमाणं भेटत असतो. तुम्ही विचारही करू शकत नाहीत की, साजिद आणि दिव्याचे पप्पा किती क्लोज आहेत.”

https://www.instagram.com/p/B_OiaAsJVb4/

पुढे बोलताना वर्धा म्हणते, “मी कधीच दिव्य्याची जागा घेण्याचा प्रयत्न नाही केला. मी माझी वेगळी जागा बनवली आहे. त्यामुळं मला ट्रोल करणं बंद करा. ती माझ्याही आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. दिव्या खूप चांगली होती. लोकांचं तिच्यावर आजही खूप प्रेम आहे.”

https://www.instagram.com/p/B_PkJRVhUXR/

5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारतीनं जगाचा निरोप घेतला. फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या घरी एक दोस्त आणि एक मेड होती. दिव्या खूप कमी वयात इंडस्ट्रीतील टॉप अॅक्ट्रेसपैकी एक होती.

https://www.instagram.com/p/BQoxasngMS5/