आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासाठी 68 कोटी मंजूर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन –  श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पालखी मार्गाचे काम मार्गी लावण्यास संदर्भात आश्वासन दिले होते. त्याचा पाठपुरावा करीत पालखी महामार्गाच्या संदर्भात अनेक बैठका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा सोबत घेण्यात आल्या होत्या यावेळी पुरंदर तालुक्यातील एकूण सतरा गावांचे भूसंपादन होणार होते. ६८.७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यातील १७ गावां पैकी १३ गावांचे भूसंपादन प्रक्रिया जानेवारी २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यापैकी सासवड व पवारवाडी वगळता उर्वरित ११ गावांची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सुमारे २३६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी जेऊर, पिसुर्टी, पिंपरी, दौंडज या चार गाव करता ६८ कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी २०२० मध्ये प्राप्त झाला कोरोना संसर्गामुळे मध्यंतरी वाटपाचे काम थांबले होते. परंतु आता वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून ६८ कोटी पैकी १५ कोटी रुपयांचे वाटप जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी पूर्ण केली आहे.

या चार गावांसाठी १५ कोटींचे वाटप करण्यात आले असून त्या गावांची यादी पुढीलप्रमाणे एकूण रक्कम कोटी मध्ये पिसुर्टी ६४७३०६१०, पिंपरी खुर्द २९०२२२९९७, दौंडज २८५२७७००, जेऊर २८७३५७३२ एकूण १५१०१७०७३९ निधी मंजूर झाल्याने या गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत आमदार संजय जगताप यांचे आभार मानले आहेत.

झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, येथील नागरिकांचा भूसंपादन प्रक्रियेला विरोध होता. त्यामुळे येथील भूसंपादन प्रक्रिया पहिल्या टप्प्यात होऊ शकले नाही. भूसंपादन अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात आमदारांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर सदरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सासवड येथील नगरपालिका हद्दीतील जमीन धारकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा म्हणून गुणांक १ वरून २ करणे बाबत शासन दरबारी आमदार संजय जगताप यांचे प्रयत्न सुरू आहेत.

उर्वरित गावांच्या भूसंपादनासाठी अंदाजे १८५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच पिंपरेखुर्द , पिसुरटी , जेऊर, दौंडज या गावातील उर्वरित शेतकऱ्यांनी आपसातील काही किरकोळ वाद असल्यास ते बाजूला ठेऊन तातडीने आवश्यक ते कागद पत्र तसेच बँक खात्याचा तपशील भुसमपदान अधिकारी यांचेकडे जमा करावा असे आवाहन देखील आमदार संजय जगताप यांनी केले आहे .