दिल्लीतील शपथविधी वादावर रितेश देशमुखची ‘सूचक’ प्रतिकिया !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेताना शेवटी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली. मात्र त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शपथविधीवेळी केलेल्या या घोषणेला विरोध करत त्यांनाा समज दिली. त्यानंतर नायडू आणि भाजपविरोधात जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता अभिनेता रितेश देशमुख यानेही या प्रकरणावार प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करत ’जय भवानी, जय शिवाजी…जय जिजाऊ, जय शिवराय,’ असे कॅप्शन लिहिले आहे. दिल्लीतील प्रकरणानंतर वादंग निर्माण झाले असतानाच रितेश देशमुखने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

’रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असे सभापतींनी संगितले होते. त्याच्यावर वाद विवाद होत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने खूप राजकारण झाले. महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसणारा नाही. तिथल्या तिथे राजीनामा दिला असता,’ असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ’ज्यांनी आक्षेप घेतला ते नेते काँग्रेस की राष्ट्रवादीचे मला माहीत नाही. जे घडले नाही ते भासविण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी विनंती आहे. काँग्रेसच्या सदस्याने का आक्षेप घेतला याचे उत्तर मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला विचारा. आक्षेप घेताना राज्यघटनेचा आधार घेतला. नायडू यांनी चुकीचे केले नाही,’ असे उदयनराजेंनी म्हटले आहे.