Bachchu Kadu On Shinde Fadnavis Govt | ‘सोयरे’ शब्दावरून बच्चू कडूंनी सरकारला फटकारले; ”दिलेला शब्द पाळता येत नसेल तर…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bachchu Kadu On Shinde Fadnavis Govt | मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारला दिलेली मुदत उद्या २४ डिसेंबरला संपत आहे. यामुळे राज्य सरकारकडून जरांगेंची मनधरणी सुरू आहे. मात्र, सोयरे शब्दावरून दोन्ही बाजूंनी घोडे अडले आहे. जरांगे सोयरे शब्दावर ठाम आहेत. सरकारने यापूर्वीच्या उपोषणावेळी जे लेखी आश्वासन दिले होते त्यामध्ये सगेसोयरे हा शब्द आहे. आता सरकारने घुमजाव केले असून या शब्दाला असहमती दर्शवली आहे. यावरून आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. (Bachchu Kadu On Shinde Fadnavis Govt)

आमदार बच्चू कडू म्हणाले, सरकारने मनोज जरांगे यांना काही शब्द दिले होते. परंतु, सरकारला ती आश्वासने पूर्ण करता आली नाहीत, हे दुर्दैवी आहे. मुळात सोयरे म्हणजे जिथे आपली सोयरीक होऊ शकते. आपली सोयरीक आपल्या जातीत होते, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. परंतु, सरकारने सोयरे शब्दाचा चुकीचा अर्थ काढला. त्यामुळे आधी सोयरे या शब्दाची व्याख्या करणे गरजेचे आहे. व्याख्या झाली तर आपल्याला पुढे जाता येईल. (Bachchu Kadu On Shinde Fadnavis Govt)

बच्चू कडू म्हणाले, मागच्या बैठकीवेळी आपण सरकारला काही शब्द दिले, सरकारनेही आपल्याला काही शब्द दिले होते. परंतु, सरकारने दिलेले शब्द पाळले नाहीत, हे खूप दुर्दैवी आहे. त्यामुळे मराठा समाजाला असे वाटते की मागच्या वेळी झाली तशी फसणवूक आता होऊ नये.

बच्चू कडू म्हणाले, माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. सरकारला आता जर एखादा शब्द द्यायचा असेल तर आधी त्याचा पूर्ण विचार करून द्यावा. शब्द दिला आणि तो पूर्ण करू शकलो नाही तर त्याचा समाजमनावर परिणाम होतो. लोकांच्या मनात सरकारविरोधात भावना निर्माण होतात. उग्र प्रतिक्रिया उमटू लागतात.

सरकारने सोयरे शब्दवरून असे केले घुमजाव…

मनोज जरांगे यांच्या सोबतच्या जालन्यातील चर्चेनंतर गिरीश महाजन म्हणाले, आमच्या याआधीच्या बैठकीत लेखी स्वरुपात काही बाबी ठरवल्या होत्या. सरकारकडून नोंदी काढण्याचे काम झाल्यानंतर त्यामध्ये ज्यांची नावे असतील त्यांना आणि त्यांच्या रक्तातील नातेवाईंकानाच आरक्षण दिले जाईल. पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण दिले जाणार नाही. देशभरात तसा कायदा आहे. परंतु, आमच्या मागील बैठकीत कागदावर काही बाबी ठरवल्या होत्या. त्यात सगेसोयरे हा शब्द होता. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार सोयरे म्हणजे आपले व्याही. या शब्दाचा शब्दश: अर्थ त्यांनी लावला आहे. परंतु, नियमानुसार रक्ताचे नातेवाईक सोडून इतरांना म्हणजे सोयरे किंवा व्याहींना आरक्षण देता येत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Will Ashok Chavan Join BJP? | अशोक चव्हाण भाजपात जाणार? भाजपा खासदाराच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – अजित पवार

Attack On Retired Police Inspector In Pune | पुण्यात निवृत्त पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला,
दगडाने मारहाण, प्रकृती चिंताजनक

Gangadham Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम येथील हिलटॉप, हिलस्लोपवरील बेकायदा शोरूम्स, गोदामांविरोधात मनपा प्रशासन मोहीम उघडणार

महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर, स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू;
चाकण येथील घटना

Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार