मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धूळ चारली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याचदरम्यान आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो, असे ट्विट करून यात उडी घेतली आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का दिला, तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे.
This bad beginning will surely lead to a good ending ! #JaiMaharashtra @BJP4Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 4, 2020
हिंमत असेल तर एक एकट्याने लढा; चंद्रकांत पाटलांचे थेट आव्हान
पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. यामुळे या निकालांमध्ये काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते. परंतु, तरीदेखील भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज देत चांगली लढत दिली. निकालांमध्ये मुद्दा असा की, शिवसेनेला काय मिळाले याचा त्यांनी विचार करायला हवा. माझे या तिघांनापण थेट आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने आमचा सामना करावा. मात्र, त्या तीन पक्षांमध्ये हिंमत नसल्याचे स्पष्ट आहे.
कसं लढायचे याचा सल्ला कोणी देऊ नये : अजित पवार
आम्ही आघाडी करून लढायचे की, एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बी कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहेत. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल, तर तसे अजिबात होता कामा नये, असे पवार म्हणाले.
…तर फडणवीस यांचा पराभव होईल
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली, तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.