‘भुलभुलैय्या’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या चित्रपटाच्या सीक्वलला उधान आले आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा ‘भुलभुलैय्या’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच आठवणीत आहे. या चित्रपटाचा आता सिक्वेल येणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सध्या चित्रपटाचे सिक्वेल येणे काही बॉलिवूडला नवीन राहिले नाही. १९७८ च्या ‘पती पत्नी और वो’ आणि १९७५ च्या ‘चुपके चुपके’ या चित्रपटांची सिक्वेल निर्मिती चालू असतानाही निर्माता भूषण कुमार आता २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुलभुलैय्या’चित्रपटाचा सीक्वेल करणार असल्याचे समजले आहे.

भूषण कुमार यांच्या ‘टी सीरिज’ या निर्मिती संस्थेने ‘भुलभुलैय्या २’ हे नाव नोंदविल्याचे समोर आले आहे. प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘भुलभुलैय्या’ हा २००५ चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा रिमेक आहे. चंद्रमुखी हा चित्रपटदेखील १९९३ च्या ‘मणीचित्रथाझु’या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. भुलभुलैय्या हा चित्रपट अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन आणि शाइनी अहुजा यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे सुपरहिट ठरला होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, ‘भूषणला भुलभुलैय्याचा सीक्वेल करायचा होता. फरहाद सामजी हा सीक्वेल लिहणार असून तोच दिग्दर्शित सुद्धा करणार आहे. चित्रपटाचे लिखाण चालू असून कथा पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात नक्की कोण काम करणार आहे हे लवकरच कळेल. चित्रपटामध्ये पूर्ण नवीन व्यक्तिरेखा दिसणार आहे.’