मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 हा सिझन प्रेक्षकांचं फार काही मनोरंजन करत नव्हतं. त्यामुळे या शोची TRP कमी झाली होती. शोची टीआरपी वाढवण्यासाठी मागील सिझनमधली (Bigg Boss 15) तिन जणांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. विशेष बाब म्हणजे या शोची टीआरपी वाढली ते राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेशमुळे (Ritesh).
गेल्या दोन वर्षांपुर्वी राखीने लग्न केलं होतं. मात्र तिचा पती कोणासमोरच आला नव्हता. एवढंच नाही तर तिच्या पतीला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. अशातच रितेशने देखील Bigg Boss 15 च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली (Wild Card Entry). त्यानंतर आता बिग बाॅसमधील रितेश राखीचा पती नसून बिग बाॅसचा कॅमेरामॅन असल्याचं म्हटलं जात आहे.
रितेश नक्की बिग बाॅसचा कॅमेरामॅन (Cameraman) आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अशी चर्चा समोर आली असल्यामुळे राखीने पुन्हा लोकांना फसवलं असल्याचं म्हटलं जात आहे. रितेशने तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्राच्या (Karan Kundra) नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर करणने प्रत्युत्तर देत राखी सावंतसोबत लग्न करुन रितेश पळून गेला, असल्याचं म्हटलं होतं.
Web Title :- Bigg Boss 15 | Rakhi Sawant raised cameraman as husband?
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update