लखनौ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असतानाच विविध नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनाही उत आला आहे. बेताल वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते नरेश अग्रवाल यांनी अखिलेश यादव यांचा उल्लेख ‘कालच पोर’ तर मायावतींचा उल्लेख ‘होलिका’ असा करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
हदोई येथील श्रावण देवी मंदिरात आयोजित कार्यकर्ता संमेलनात सहभाग होण्यासाठी आलेल्या नरेश अग्रवाल यांनी मायावती यांच्याविषयी अक्षेपार्ह विधान करत त्यांची तुलना होलिकेशी केली आहे. होलिका दहनाची सुरुात हरदोई येथून झाली होती. तेव्हा बुआ जळाली होती. आजच्या निवडणुकीच्या वातावरणात बुआ आणि बबुआची जाळण्याची वेळ आली आहे.
अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री बनवणे ही चूक होती. ते सरकारी बंगला सोडताना नळाची तोटीसुद्ध उखडून घेऊन गेले. आता जनतेची तोटी उडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टिका नरेश अग्रवाल यांनी केला आहे.
महाआघाडीवर टीका करताना अग्रवाल म्हणाले, आघाडी ही पती-पत्नीमध्ये होते. भाऊ-बहीण आणि आत्यामध्ये कसली आघाडी, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राहुल गांधी यांच्यावर देखील अग्रवाल यांनी टीका केली. पक्षाची सत्ता असताना सरकारमधील रिक्त पदे वेळीच भरली असती तर आज २२ पदे रिक्त राहिली नसती.