शिवसेनेशिवाय निवडणूका लढण्यासाठी भाजपची तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर सतत टीका करणाऱ्या शिवसेनेशिवाय आगामी निवडणुका लढण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक दादरच्या वसंत स्मृती या मुंबई भाजपच्या मुख्यालयात झाली असता या बैठकीला उपस्थित बहुतांश पदाधिकाऱ्यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यामुळे या बैठकीत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघात थेट बूथपातळीपर्यंत पक्ष संघटना निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्याची तयारी करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’877d5bbc-c203-11e8-ab41-55d7e9b93562′]

राज्यातील ९२ हजार बूथपर्यंत सरकारची कामगिरी पोहोचवण्याचा आदेश बैठकीत पदाधिकारी, मतदारसंघांचे प्रभारी यांना देण्यात आला. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेना युती झाली पाहिजे, यावर भाजपच्या शिखर समितीत सहमती झाली आहे. विचारांची समानता आणि गेल्या २५ वर्षांतील युती या आधारावर आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती व्हावी ही भाजपची इच्छा आहे.

[amazon_link asins=’B01M13P84R’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’944ec2a0-c203-11e8-8688-ef2704cc7e55′]

शिवसेना सातत्याने भाजपवर टीका करत असल्याबाबत विचारले असता, आपले मत मांडण्याचा शिवसेनेला अधिकार आहे, आमच्यात शत्रुत्व आहे, असा याचा अर्थ होत नाहीे. इंधन दरवाढीबाबत मुनगंटीवार म्हणाले, पेट्रोल-डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणावे, असा प्रस्ताव राज्य सरकारने दिला आहे. २८ सप्टेंबरला जीएसटी परिषदेच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास देशभरातच पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल. पण जीएसटी परिषदेत निर्णय नाही झाला तर महाराष्ट्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून काही प्रमाणात लोकांना दिलासा देईल. एक रुपया कर कमी केला तर २२०० कोटी रुपयांच्या वार्षिक महसुलावर राज्य सरकारला पाणी सोडावे लागते.

उद्या व्यापाऱ्यांचा भारत बंद

दरम्यान, पदाधिकाऱ्यांची ही बैठक सकाळी झाल्यावर दुपारपासून रात्रीपर्यंत राज्यभरातील पक्ष संघटनेच्या तयारीचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. आज सकाळी प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून तिचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व आमदार, खासदार, विशेष निमंत्रितांसह सुमारे ५५० जण या बैठकीस उपस्थित असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने समारोप होणार आहे.