मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘सध्याच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे’, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज्यपाल काय पाऊल उचलतात याकडे आमचं लक्ष आहे. अद्याप आम्ही कोणताही रणनीती ठरवलेली नाही.” यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, आघाडीची इच्छा आहे की, राज्यात भाजपचे सरकार येऊ नये यासाठी तुम्ही काही पाऊल उचललंय का? या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “योग्य वेळ आल्यानंतर राज्यपालांना निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीकडे आमचं लक्ष आहे. अद्याप आमची कोणतीही रणनीती ठरलेली नाही. राज्यात भाजप सरकार येऊ नये यासाठी काय करावं लागेल याचा विचार आम्ही करतो आहोत. सध्याच्या सर्व परिस्थितीला भाजप सरकार जबाबदार आहे.”
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या