मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जात होते. अखेर महाविकासआघाडी सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील 15 सनदी अधिकाऱ्यांच्या आज (16 जानेवारी) बदल्या करण्यात आल्या आहेत.
1) राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर याची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास.
2) संजीव कुमार , अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई.
3)श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरीक्त विभागीय आयुक्त पुणे.
4) प्रवीण दराडे अतिरीक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त समाज कल्याण पुणे.
5) सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची अखेर मुंबई येथे पदोन्नतीवर माहिती महासंचालक या पदावर बदली झाली आहे.
6) सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची बदली झाली असून मिलिंद शंभरकर हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी झाले आहेत.
7) जे मुखर्जी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांची नियुक्ती मुख्य सचिव अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुबई झाली आहे.
8) एस ए तागडे प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव वस्रोद्योग.
9) डॉ के एच गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरीक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई.
10) बी वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने.
11) शैला ए विक्रीकर यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मुंबई.
12) शेखर सिंग, जिल्हाधिकारी गडचिरोली यांची बदली जिल्हाधिकारी सातारा.
13) पी वेलरासू, सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरीक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका.
14) असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा.
15) दीपिक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –