पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकता सुधार अधिनियम आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एका तासामध्ये संपविली जाऊ शकते, असे हरियाणातील कैथलमधील भाजप आमदार लिलाराम गुर्जर यांनी म्हटले आहे. तसेच हा नेहरू व गांधींचा हिंदुस्थान नाही तर नरेंद्र मोदींचा हिंदुस्थान आहे. जर ते लक्षात आले तर आम्ही एका तासात त्यांचा नाश करू शकतो, असेही ते म्हणाले.
हरियाणात कॉंग्रेसचे नेते रणदीपसिंग सुरजेवाल यांना पराभूत करणारे लिलाराम गुर्जर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ‘आजचा भारत हा नेहरू व गांधींचा नाही. तर मोदी आणि अमित शाहचा भारत आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे उदाहरण देऊन नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे, अशा शब्दात मोदींचे कौतुकही केले. तसेच पुढे बोलताना लिलाराम गुर्जर म्हणाले की, मुस्लिमांना देश सोडून बाहेर जावे लागेल असे काही नाही. पण बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्यांना नक्कीच देश सोडावा लागेल.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ ५ वनस्पती जवळपास ठेवल्या तर डास जातील पळून !
- ‘या’ ७ उपायांनी मासिक पाळीच्या वेदना होतील दूर !
- ‘सोशल मीडिया’वर सतत ‘अॅक्टिव्ह’ राहण्याचे ‘हे’ आहेत ३ दुष्परिणाम
- उपाशीपोटी ‘हे’ ७ पदार्थ चुकूनही खाऊ नका, जाणून घ्या परिणाम
- ‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक !
- ‘हे’ आहेत चॉकलेटचे ८ आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या
- सकाळी चालायला जाता, मग ‘ब्रिस्कवॉक’ घ्या, ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
- मुळ्याचे ‘हे’ १५ आरोग्यवर्धक फायदे माहिती आहेत का ? जाणून घ्या
- पायावर उभे राहूनही काम करायला शिका, ‘हे’ आहेत ४ फायदे
- ‘हे’ तेल हृदयासाठी ‘टॉनिक’, 9 प्रकारच्या आजारांपासून ठेवतं दूर, जाणून घ्या
- उत्तम आरोग्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ नियमित खा, जाणून घ्या कोणते