दहावीच्या निकालाच्या टेन्शनमुळे विद्यार्थ्याला हार्ट अटॅक

सटाणा : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. दहावी आणि बारावी चे शैक्षणिक वर्ष अतिशय महत्वाचे मानले जाते. निकाल येण्यापूर्वीच निकालाच्या चिंतेने सटाणा येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक मधील सटाणा शहरातील गिरीश बच्छाव या विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा दिली होती. दहावीच्या परीक्षेत पास होणार कि नाही याची चिंता त्याला नेहमी सतावत होती. त्यातूनच त्याला हार्ट अटॅक आला असे गिरीशच्या नातेवाइकानाचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.