मुलगा होत नसल्यामुळे तिने घेतला पुतण्याचा बळी

मिरजः (कागवाड) पोलीसनामा आॅनलाईन

मुलगा होत नसल्याच्या रागापायी चुलतीनेच पुतण्याचा पाण्याच्या बॅरेलमध्ये बुडवून बळी घेतल्याची धक्कादायक घटना शेडबाळ या ठिकाणी समोर आली आहे. कार्तिक राजू आलासे (वय-2) असे हत्या झालेल्या बालकाचे नाव असून, चुलत चुलती जयश्री आलासे हिने त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात आरोपी महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेडबाळ येथे आलासे कुटुंबिय वास्तव्यास आहे. मागील काही दिवसापासून या भाऊबंदकीमध्ये वाद सुरू होता. त्यातून नेहमीच त्यांची भांडणे होत होती. शुक्रवारी कार्तिकचे वडील राजू आलासे व आई रुपा आलासे हे दोघे कार्तिकला त्याच्या आजीजवळ ठेवून मिरज येथील दवाखान्यामध्ये गेले होते. याचाच फायदा घेत शेजारी राहणारी जयश्री हिने झोपलेल्या कार्तिकला उचलून आणून घरातील पाण्याने भरलेल्या ड्रम मध्ये टाकून झाकण लावले. त्यानंतर घरातील दिवे बंद करुन घरातून पळ काढला.

जतमधील पारधी तांडयावर पोलिसांचे कॉबिंग ऑपरेशन; दोघेजण ताब्यात

दरम्यान, कार्तिक दिसेनासा झाल्याने आजीने शोध सुरू केला. मात्र तो मिळून आला नाही. यावेळी जयश्रीचा पती घरी आल्यानंतर हातपाय धुण्यासाठी ड्रमचे झाकण उघडले तेव्हा कार्तिकचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्याने तात्काळ मृतदेह बाहेर काढून घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्याची माहिती कार्तिकच्या आई, वडिलांना दिल्यानंतर ते गावात परतल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी अथणीचे मंडळ पोलिस निरीक्षक एच. शेखराप्पा, फौजदार समीर मुल्ला यांनी भेट देऊन पंचनामा केला.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea74d5fb-a9cf-11e8-9036-0f705c821c02′]