IPL 2020 : प्ले ऑफच्या बाहेर झाल्यानंतर MS धोनीला वेदना, म्हणाला – ‘आता फक्त 12 तास शिल्लक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीगच्या चालू सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास सोमवारी केकेआरशी सामना संपल्यानंतर संपुष्टात येईल, पण महेंद्रसिंग धोनीला आपल्या शेवटच्या वेदनादायक 12 तासाच्या प्रत्येक घटकाचा आनंद घेण्याची इच्छा आहे. केकेआरचे 12 अंक आहे आणि सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध जिंकल्यास त्यांचे अंक 14 होतील. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचे प्रत्येकी 14 अंक आहेत. पुढील दोन्ही सामने जिंकल्यास चेन्नईला केवळ 12 अंक मिळू शकतील.

धोनी म्हणाला की, वेदनादायक 12 तास बाकी
धोनी सामन्यानंतर म्हणाला की, ‘चांगली कामगिरी न केल्याने त्रास होतो. आमचे शेवटचे वेदनादायक 12 तास स्पर्धेत बाकी आहेत. आम्हाला त्याचा पूर्ण आनंद घ्यावा लागेल. पॉईंट टेबलमध्ये आपण कुठे आहोत याचा फरक पडत नाही.’ तो म्हणाला की, ‘जर तुम्ही क्रिकेटचा आनंद घेत नसलात तर ते क्रूर आणि वेदनादायक असू शकते. माझ्या युवा खेळाडूंच्या कामगिरीने मी आनंदी आहे.’ आरसीबीवरील आठ विकेट्सच्या विजयात चेन्नईच्या खेळाडूंनी जशी कामगिरी केली, संपूर्ण स्पर्धेत धोनीलाही तशीच खेळाची अपेक्षा होती.

धोनी म्हणाला की, ‘ही एक उत्तम कामगिरी होती. प्रत्येकाने चांगली कामगिरी केली. आम्ही विकेट घेतले आणि त्यांना कमी धावा करण्यापासून रोखलं. ”फलंदाज रुतुराज गायकवाड याच्याशिवाय इम्रान ताहिर आणि मिशेल सॅटनर या गोलंदाजीचीही त्याने प्रशंसा केली.

चेन्नई सुपर किंग्ज पहिल्यांदा प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे
आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती आणि धोनीची टीम पहिल्या सत्रात अंतिम फेरीपर्यंत गेली होती. मात्र अंतिम सामन्यात त्याला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. 2016 आणि 2017 मध्ये चेन्नईचा संघ निलंबित करण्यात आला होता आणि 2018 मध्ये परतीसह चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएल करंडक जिंकला. 2019 मध्ये चेन्नई संघाने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आणि मुंबईमध्ये त्यांचा पराभव झाला परंतु, यावेळी 2020 मधील चेन्नई सुपरकिंग्जचा प्रवास ग्रुप टप्प्यातच संपला.