दिल्ली : भाजपमध्ये सुरू झालं ‘मंथन’, जेपी नड्डांनी मनोज तिवारींना बोलावलं, विचारणार पराभवाची कारणं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्ष वरून जरी शांत दिसत असेल, परंतु पक्षांतर्गत तीव्र अस्वस्थता आहे. आता याच पराभवाच्या कारणास्तव भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडे जाब विचारणार आहेत. यासाठी पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.
दरम्यान, निवडणुकीचा जोरदार प्रचार करत भाजपने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकतील, असे आश्वासन केले होते. खुद्द मनोज तिवारी यांनीही ४८ जागा जिंकण्याचे आश्वासन दिले होते. पण असे झाले नाही, ८ जागांवर भाजपचा रथ ठप्प झाला. यासंदर्भातच गुरुवारी मनोज तिवारी यांच्यासह पक्षाचे संघटनेचे मंत्री बी.एल. संतोष जेपी नड्डा यांना भेटून पराभवाची चर्चा करणार आहेत. बुधवारी एका निवेदनात मनोज तिवारी म्हणाले की, त्यांना पक्षाने राजीनामा देण्यास सांगितले नाही तसेच राजीनामा देण्याची ऑफरही दिली नाही. दिल्ली भाजपमध्ये निवडणुकांचे संघटन लवकरच घेण्यात येणार आहे, त्यामुळे राजीनामा मागितला गेला नाही.
A meeting between BJP national president Jagat Prakash Nadda and Delhi BJP chief Manoj Tiwari is underway in Delhi. (file pics) pic.twitter.com/pvGUyjKSOE
— ANI (@ANI) February 13, 2020
मनोज तिवारी यांचा विजयाचा विश्वास होता :
मनोज तिवारी यांना भारतीय जनता पक्षाच्या विजयाबद्दल खात्री होती. निकालाच्या दिवशीही तिवारी विजयाचा दावा करीत होते. निकालाच्या दिवशी सकाळी मनोज तिवारी सांगत होते की, संध्याकाळपर्यंतच्या निकालामध्ये भाजप बहुमत गाठेल. पण भाजपला दुहेरी आकडादेखील ओलांडता आला नाही. यापूर्वी एक्झिट पोलमध्येही भाजपाचा पराभव दिसून आला होता तेव्हा मनोज तिवारी यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला होता.
एकीकडे भारतीय जनता पक्षाने मंथन सुरू केले आहे, दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये सतत ० आल्याने गोंधळ सुरू झाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा, प्रभारी पीसी चाको यांनी राजीनामा दिला असून दोन्ही नेत्यांचा राजीनामा कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वीकारला आहे.