‘विटामिन’साठी चुकूनही ‘या’ फळांचा आहारात समावेश करू नका, फायदा ऐवजी होईल ‘मोठं’ नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तम आरोग्यसाठी आणि निरोगी शरीरासाठी फळे खूप आवश्यक असतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडेंट्स, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. यामुळेच नेहमी फळे खाण्यासाठी सांगितले जाते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की अशी काही फळे तुम्ही फायदेशीर म्हणून खात आहात, जी की तुमच्यासाठी धोकादायक आहेत. वास्तविक, अशी काही फळे आहेत ज्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आढळते आणि यामुळे, शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ही फळे खाणे टाळावे
मधुमेह असलेल्या व्यक्तीने हे फळ अजिबात खाऊ नहे कारण हे खाल्ल्याने तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढू शकते. आंबा, केळी यासारखी गोड फळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने खाऊ नये. तुम्ही थेट फळे खाण्याऐवजी त्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता.

साखरेचे प्रमाण आंबा आणि अंजिरात खूप जास्त असते त्याच प्रमाने करवंदांमध्ये देखील साखरेचे प्रमाण जास्त असते. यामध्ये साखर जरी जास्त असली तरी तुम्हाला थोड्या फार प्रमाणात याचे सेवन केले पाहिजे.

फळांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे ते अन्न पचन करण्यास मदत करते. ही फळे तुमची पचन क्षमता वाढवतात. विद्रव्य आणि अघुलनशील फायबरचे प्रमाण फळांमध्ये असते. द्राक्ष सोडून प्रत्येक फळात फायबर असते त्याचप्रमाणे साखरेचे प्रमाण देखील असते. केवळ द्राक्षातील साखरेचे प्रमाण फारच कमी आहे.

Visit : Policenama.com