ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाने घेतले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईव्हीएमची विश्वासर्हता वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध करणे, मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवणे असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

व्हीव्हीपॅट मशीन्सचा सार्वत्रिक वापर करण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे. तसेच ईव्हीएम मशीन हॅक होऊ नये किंवा मशीनसोबत छेडछाड होऊ नये तसेच मशीनवर निवडणूक आयोगाचा संपूर्ण ताबा रहावा यासाठी मशीन्सवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. आगामी मतदानावेळी मशीनमध्ये करण्यात आलेला बदल म्हणजे सर्व मशीन्सवर उमेदवारांची छायाचित्रे पहायला मिळणार आहेत.
२०१४ मध्ये भाजपाने बहुमत मिळवून सरकार स्थापन केले होते.

त्यानंतर अनेक विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या. यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून भाजपने मशीन हॅक केल्याचा आरोप केला होता. विरोधकांकडून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी होत आहे. यानंतर ईव्हीएम मशीनची विश्वासर्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने हे बदल केले आहेत.

ह्याहि बातम्या वाचा –


▶लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर ; महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार निवडणूका

▶#Loksabha 2019 : राज्यातील ४८ मतदारसंघात ‘या’ तारखेला मतदान

▶#Loksabha Election 2019 : पुणे, बारामती २३ ला तर मावळ, शिरुर २९ ला मतदान

▶राज्यात ११ एप्रिलला ‘या’ ७ मतदारसंघात होणार मतदान

▶राज्यात २३ एप्रिलला ‘या’ १४ मतदारसंघात होणार मतदान

▶राज्यात २९ एप्रिलला ‘या’ १७ मतदारसंघात होणार मतदान