अमेरिकेनच चीनला ‘मोठं’ करण्यासाठी ‘खत-पाणी’ घालून ‘मुर्खपणा’ केला, टॉप इंटरनॅशनल रिलेशन्स एक्पसर्टनी सांगितलं

नवी दिल्ली : राजकीय तज्ज्ञ आणि शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये अंतरराष्ट्रीय संबंधांचे विचारवंत जॉन मियरशायमर यांनी 20 वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती की, 21व्या शताब्दीमध्ये चीनचा उदय शांतीपूर्ण होणार नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये संरक्षण प्रतिस्पर्धा होईल, ज्याचा शेवट युद्धात होईल.

इंडिया टुडेच्या विशेष चर्चेत जागतिक विचारवंतासह सहभागी झालेल्या जॉन मियरशायमर यांनी म्हटले की, चीन प्रभुत्ववादी शक्ती बनण्यासाठी इच्छूक आहे आणि सोबतच भारतासह आपली सीमा बदलण्याच्या विचारात आहे.

अमेरिका चीनची वाढती ताकद अ‍ॅडजस्ट करण्यात अपयशी ठरली आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रो. मियरशायमर म्हणाले, अमेरिकेने चीनला अ‍ॅडजस्ट करण्यात अपयशी ठरण्यापेक्षा आणखी खुप काही बिघडवले आहे.

प्रोफेसर म्हणाले, अमेरिकेने मागील शतकातील शेवटचे दशक आणि या शतकातील पहिल्या दिड दशकात चीनला आर्थिकदृष्ट्या आणखी ताकदवान बनवण्यात सहकार्य केले आहे, प्रत्यक्षात आम्ही संभाव्य बरोबरीचा प्रतिस्पर्धी उभा केला आहे. हा हैराण करणारा मुर्खपणा आहे.

मियरशायमर यांनी असेही म्हटले की, अमेरिकेने धोका ओळखला आणि पुन्हा चीनवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरूवात केली. पारंपारिक पद्धतीने अंतरराष्ट्रीय संबंधासाठी एक आणखी वेगळी थेअरी आहे, ज्यास प्रसिद्ध आशियाई मुत्सद्दी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे माजी अध्यक्ष किशोर महबूबानी यांच्यासारखे थिंकर्स आणखी खतपाणी घालतात. महबूबानी हे नवे पुस्तक हॅज चायना वोन? द चायनीज चॅलेंज टू अमेरिकन प्रायमसी (काय चीन जिंकला आहे? अमेरिकन प्राधान्याला चीनी आव्हान) चे लेखक आहेत.

महबूबानी यांचा अंदाज आहे की, चीन 21व्या शतकातील अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाच्या दर्जावर कब्जा करेल. परंतु, त्यांचे म्हणणे आहे की, चीन यथास्थिती शक्ती आहे, ती क्रांतिकारी नाही, आणि चीनशी संघर्ष अपरिहार्य आणि टाळता येणारा, असा दोन्ही सुद्धा आहे.

आशिया आणि पश्चिममध्ये वाढत्या संघर्षासंबंधी महबूबानी यांच्या दृष्टीकोनाच्या प्रतिक्रियेवर मियरशायमर म्हणाले, हा पश्चिम विरूद्ध आशियाचा नव्हे, हा आपल्या अनेक शेजार्‍यांच्या विरूद्ध चीनचा मुद्दा आहे, ज्यामध्ये भारत आणि चीनसुद्धा आहे.

प्रो मियरशायमर म्हणाले, तुम्ही अशी स्थिती पाहणार आहात की, भारत आणि अमेरिका, व्हिएतनाम आणि अमेरिका, भारत-जापान, ऑस्ट्रेलिया-अमेरिका, सर्व चीनच्या विरूद्ध समतोलवादी सहकार्यासाठी हातमिळवणी करू शकतात.

आशियाचे सर्वाधिक प्रसिद्ध, प्रभावी थिंक टँक्सपैकी एक असलेले ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर सरन सुद्धा जागतिक विचारवंताच्या पॅनलमध्ये होते ज्यांनी इंडिया टुडेवर भारत-चीन स्थितीवर विचार मांडले.

सरन यांना जेव्हा विचारण्यात आले की, एलएसीवर सध्याचा संघर्षात भारताची कोणती भूमिक पाहता, सोबतच चीन आणि अमेरिकेतील संघर्षावर तुमचे मत काय आहे, तेव्हा त्यांनी 3-एम फ्रेमवर्कचा संदर्भ दिला.

सरन म्हणाले, तुम्ही एका मध्यवर्ती किंगडम चेहर्‍याचा पुन्हा मोठा उदय होताना पाहाल. चीन समजतो की, तो जगाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि नियम त्याच्या जागतिक आणि स्थानिक व्यवहारांवर प्रतिबंध घालू शकणार नाही.

सरन यांनी अन्य ‘च’बाबत म्हटले, चीनी अपवादाला दोन आणखी ‘च’ समर्थन देतात – मॉडर्न टूल्स ऑफ एंगेजमेंट (कराराची आधुनिक साधने) आणि मध्ययुगीन मानसिकता.

सरन म्हणाले, त्यांनी जागतिक व्यासपीठ मिळवणे आणि त्यावर प्रभुत्व दाखवण्यास सुरू केली, आधुनिक सैन्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आणि हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने केले. मात्र, तो मिडल किंगडम होऊ शकतो, मानसिकता मध्ययुगीन असू शकते. तो इनोव्हेशन, उद्यमता आणि व्यक्तींवर कंट्रोल यावर विश्वास ठेवतो. त्यांनी हुकुमशाही आणि अत्याचारवादी शासनकर्त्यांशी भागीदारी केली. त्यांनी संघर्षात खिळे लावलेल्या लोखंडी रॉडचा आणि काटेरी तारा लावलेल्या बेस बॉलच्या बॅट्सचा वापर केला. शस्त्र वापरली जाणार नाहीत, असे ठरले असतानाही या शस्त्रांचा वापर त्यांनी केला.

गलवान खोर्‍यात हिंसक हल्ला त्या रस्त्यांचे अंतर दाखवतो जो चीन आणि भारत आशियाच्या भविष्याबाबत विचार करतात. चीन विचार करतो की, सूर्य केवळ पूर्वेला उगवू शकतो. तर भारत जागतिक व्यासपीठावर प्लेयर बनणण्यासाठी प्रतिबद्ध आहे, जो आपल्या क्षमता वेगाने विकसीत करू इच्छितो.