ठाकरे सरकारकडून मित्रपक्षांचा ‘विश्वासघात’, सरकार कोसळणार असल्याचं ‘या’ माजी मंत्र्याकडून ‘भाकित’

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीतील पक्षांना अतंर्गत नाराजीसह मित्रपक्षांच्या नाराजीलाही तोंड द्यावे लागत आहे. महाविकास अघाडीने मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रणही दिले नाही, तसेच बैठकीलाही बोलावले नाही, यावरून ठाकरे सरकारने आपला वापर करून आता दूर केले आहे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. राजू शेट्टी यांच्यानंतर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनीही ठाकरे सरकारला विश्वासघातकी म्हणत, टीका केली आहे. कर्तबगार निष्ठावंत आमदारांना डावलल्याने या मंत्रिमंडळ विस्ताराने नाराज नेते बाजूल होतील आणि सरकार कोसळेल, असे भाकितही लोणीकर यांनी केले आहे.

लोणीकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे अबू आझमी या सर्व नेत्यांचा विसर ठाकरे सरकारला पडला आहे. या नेत्यांच्या मदतीने काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत मते घेतली. त्यानंतर या नेत्यांना मंत्रिपद तर दिले नाहीच, शिवाय मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्याला आणि बैठकीलाही बोलावले नाही. असे करून सरकारने मित्र पक्षांचा विश्वासघात केला. हे विश्वासघातकी मंत्रिमंडळ आहे.

लोणीकर पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आज नाराज झाले आहेत. शिवाय त्यांच्याच पक्षातील काही आमदारही नाराज आहेत. तिन्ही पक्षांनी निष्ठावंत आणि कर्तबगार आमदारांनाही डावलले आहे. पक्षातील लोकांना नाराज करुन काही मोजक्या लोकांना मंत्रिमंडळात संधी दिली गेली आहे. हे सर्व नाराज नेते तिन्ही पक्षांपासून दूर जातील आणि हे सरकार पडेल, असे भाकित लोणीकर वर्तवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेकडून 12, राष्ट्रवादीकडून 14 आणि काँग्रेसकडून 10 अशा एकुण 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये एक-दोन अपवाद वगळता मित्रपक्षांना डावलण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे ठाकरे सरकारमधील मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. राजू शेट्टी यांच्यानंतर आता बबनराव लोणीकर यांनी सरकारवर आरोप केला आहे.

मंत्र्यांची यादी
शिवसेना

आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)

काँग्रेस

के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वड्डेटीवार (चंद्रपूर)
सुनील केदार (नागपूर)
अस्लम शेख (मुंबई)
वर्षा गायकवाड (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर)
विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली)

राष्ट्रवादी

अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख (नागपूर)
डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा)
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक (मुंबई)
बाळासाहेब पाटील (कराड, सातारा)
राजेश टोपे (अंबड, जालना)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर)
दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर)
अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर)

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा