धक्कादायक ! लग्नानंतर ‘मधूचंद्र पाहण्यापुर्वीच नववधूचं ‘अपहरण’, शेतात ‘खुल्लमखुल्ला’ गँगरेप केल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील हापूर येथून इथं धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचं अपहरण करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी रोजी विवाह संपन्न झाल्यावर नववधूचा सासरी गृहप्रवेश झाल्यानंतर ती आपल्या पतीच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरातील सदस्य दोघांना चहा देण्यासाठी गेले, त्यावेळी नववधू खोलीमध्ये नसल्याचं समोर आलं. घरातही बराच शोध घेतल्यावरही तिचा पत्ता लागला नाही. हाफिजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

नववधू बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या सासरकडच्यांनी तातडीने तिच्या माहेरी कळवली, ज्यांनंतर दोन्ही कुटुंबांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण ती कुठेही न सापडल्याने अखेर हाफिजपूर पोलीस स्टेशनमध्ये तिची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. परंतु, घटनेनंतर आज या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता असलेली नववधू हापूर पोलीस स्टेशन हद्दीत हायवेजवळ जखमी अवस्थेत आढळली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या पहिल्या रात्री दोन बुरखा घातलेल्या व्यक्तीनी माझं अपहरण करून मला 24 तास एका शेतात लपवून ठेवलं होतं. त्यानंतर माझ्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरूणीचा तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

परंतु, लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचं अपहरण करून तिला घरापासून 15 किलोमीटर दूर हायवेच्या किनाऱ्यावर कुणी सोडलं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक राजेश कुमार यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा –