आग्या मोहळाच्या माशांचा भाविकांवर हल्ला ; ३५ भाविकांसह ४५ जखमी

नगर जिल्ह्यातील मार्कंडेश्वर डोंगरावरील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्ह्यातील मार्कंडेश्वर डोंगरावर गेलेल्या पालखीवर मधमाशांनी हल्ला चढवला. या घटनेत पालखीतील ३५ जणांसह १० पर्य़टकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. या घटनेत एकूण ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मार्कंडेश्वर डोंगरावरील देवीच्या उत्सवासाठी येवले गावातील पालखी घेऊन भाविक आले होते. यावेळी कुणीतरी त्या ठिकाणी असलेल्या आग्या मोहळाच्या पोळ्यावर दगड मारला. त्यामुळे खवळलेल्या मधमाश्यांनी भाविकांवर हल्ला केला. यामध्ये ३५ भावीक जखमी झाले. तर पर्य़टनासाठी आलेले १० जण देखील मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले. अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने पळण्याच्या नादात पाय घसरुन पडल्याने काही भावीक जखमी झाले.

अदमदनगरमधील एक 10 जणांचा समूह या गडावर फिरण्यासाठी आला होता. गडाच्या पायथ्यालाच स्थानीक नागरिकांनी त्यांना या घटनेबाबत कल्पना दिली होती.  मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी मधमाशांनी त्या दहा जणांवरही हल्ला चढवला. यात हे दहाजण देखील जखमी झाले आहेत. या दहांपैकी एक जण गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.