मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राजकीय भूकंप होवुन भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे मोठे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपण मरेपर्यंत शरद पवारांबरोबर असल्याचे सांगितले आहे.
अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिध्द करण्यासाठी वेळ दिला आहे. आगामी 7 दिवसात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार हे आता निश्चित झाले आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कोण-कोण आमदार आहेत हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांची आज (शनिवार) दुपारी साडेचार वाजता वायबी सेंटरला बैठक होणार आहे. सर्व आमदारांच्या समोर अजित पवार की शरद पवार असा पश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे बडे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपण मरेपर्यंत शरद पवारांसोबत असणार असल्याचे सांगितले आहे.
Visit : Policenama.com
- सुगंधी तेलच्या मसाजने होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- थंडीत गरम कपडे परिधान कराच, अन्यथा बिघडू शकते आरोग्य, लक्षात ठेवा ४ गोष्टी
- आहारात ‘व्हिटॅमिन सी’ हवेच, अन्यथा होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या
- शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!
- थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय
- ‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या
- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा