4 महिन्यांनंतर डावपेचांमध्ये भारताची पहिल्यांदाच चीनवर मात

पोलिसनामा ऑनलाईन – पूर्व लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या जवळजवळ 4 महिन्यांनंतर भारताने पहिल्यांदाच चीनच्या डावपेचात्मक हालचालींनी मात केली. पहाट उजाडेपर्यंत भारतीय फौजांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्‍याकडून शिरकाव करत प्रत्यक्ष ताबारेषेवरील काही महत्त्वाची उंच ठिकाणे ताब्यात घेतली. या हालचालीमुळे, प्रत्यक्ष ताबारेषेवरील चिनी हद्दीतील ठाण्यांना धोका निर्माण झाला आहे.

पीएलएच्या फौजा वाटचाल करत असल्याचे नजरेला पडले असल्यामुळे चीनच्या या कृतीचा आपल्याला आधीच अंदाज आला होता, असे भारतीय लष्कराने सांगितले. मात्र, उंच ठिकाणावर पोहोचण्याच्या या मोहिमेसाठी एक महिन्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागले. फौजा माघारी घेण्याबाबत चीन गंभीर नसल्याची जाणीव झालेली असल्याने अशा प्रकारची कृती करण्याच्या योजनेसाठी दिल्लीहून राजकीय स्तरावर हिरवा कंदील मिळाला होता, असे सुरक्षा दलांतील सूत्रांनी सांगितले.