‘सस्पेन्स’ कायम ! धनंजय मुंडे प्रकरणाची एका आठवड्यात चौकशी पुर्ण करण्याच्या सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे चागलेच अडचणीत सापडले आहेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच भाजपमधीलच नेते कृष्णा हेगडे, मनसेचे मनिष धुरी यांनी तक्रारदार महिलेविरोधात विविध केले आहेत, त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्याचबरोबर मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा महिलेकडून करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची एका आठवड्यात चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेत, तसेच आरोप भाजपा नेते कृष्णा हेगडे, मनसेचे मनिष धुरी यांनी तक्रारदार महिलेविरोधात केले आहेत, तक्रारदार महिला ब्लॅकमेलर असून हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून पैसे लुबाडते असा आरोप झाल्याने धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तुर्तास राजीनाम्यापासून दिलासा मिळाला आहे.

याबाबत शरद पवार म्हणाले की, आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्याचसोबत त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी या प्रकरणी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त संदीर कर्णिक, ज्योत्सना रासम यांची बैठक घेतली, सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी अशी सूचना गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे अशी बातमी टीओआयनं दिली आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिलाही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी केलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तसेच ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’, असे ट्विट तिने केले आहे. ‘मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत? मला हटविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत.