लखनऊ : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीच्या नेता जया बच्चन यांनी लखनऊनधील प्रचारसभेत नाव न घेता अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जो रखवाला आहे तोच गडबड करत आहे असे वक्तव्य जया बच्चन यांनी केले आहे. लखनऊमधील समाजवादी पार्टीच्या उमेदवार पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी मोदींवर आपली तोफ डागली.
जया बच्चन म्हणाल्या की, रखवाला जो आहे त्याची जबाबदारी खूपच महत्त्वाची आणि गरजेची आहे. आज देशात जे वातावरण आहे, जो रखवाला आहे तोच देशात गडबड करत आहे. असे म्हणत नाव न घेता जया बच्चन यांनी मोदींवरच टीका केली आहे.
Jaya Bachchan, Samajwadi Party in Lucknow: Rakhwale ki zimmedari bahut zaruri hai aur bahut aham hai. Iss desh mein iss waqt jo mahaul hai, jo rakhwala hai wahi desh ke saath gadbad kar raha hai. pic.twitter.com/nnMgZ4jYUH
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 30, 2019
यावेळी बोलताना जया बच्चन यांनी पूनम सिन्हा यांना निवडून देण्यासाठी आवाहन केलं. त्या म्हणाल्या की, तुम्हा लोकांना पूनम यांना जिंकून देण्याचे वचन द्यायला हवे. नाहीतर पूनम मुंबईतील माझ्या एंट्रीला बंदी घालेल. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी चाळीस वर्षांपासून त्यांना ओळखते. याशिवाय त्या म्हणाल्या की, जो उत्साह आता दिसत आहे असाच उत्साह मतदानाच्यावेळीही दिसायला हवा. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी आवाहनही केले.