हवाई हल्ल्यावर कमल हसनने केले हे ट्विट 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कश्मीरमध्ये सार्वमत घ्या असे वादग्रस्त विधान करणारे दक्षिणेतील अभिनेते आणि राजकीय नेते कमल हसन  यांनी भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्याचे कौतुक केले आहे. १२ लढाऊ विमानांच्या सहाय्याने दहशतवादी शिबिरावर हल्ला करून भारतात पुन्हा परत येण्याची कामगिरी केल्या बद्दल मला भारतीय हवाई दलाचा अभिमान वाटतो असे कमल हसन यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे.

आज पहाटे ३ : ३० वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळावर टाकले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ३२५ दहशतवादी ठार झाले आहेत. त्याच प्रमाणे या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरचे दोन भाऊ आणि एक मेहुणा देखील ठार झाला आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनेला भारताने मोठा हादरा दिला आहे.

कश्मीरमध्ये सार्वमत घ्या…! या वक्तव्यावरून टीकेचे लक्ष ठरलेले कमल हसन यांनी भारतीय वायुसेनेच्या कामगिरीवर बद्दल कौतुक करून मागील वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

https://twitter.com/ikamalhaasan/status/1100266475854618625