पोलीसनामा ऑनलाइन –
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे| सहजवन होता नाम घेता पुकाचे||
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म| उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म||
हा श्लोक जेवणाआधी म्हणतात. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण या श्लोकाद्वारे पोटातल्या अग्नीची पूजा करतो, त्याला वंदन करतो. अन्नग्रहण करणे म्हणजे ते फक्त पोट भरण्यासाठी नाही तर हे एक पवित्र यज्ञकर्म आहे. त्यामुळे ते विनम्र व समाधानाने करणे आवश्यक असल्याचे पुराणात सांगण्यात आले आहे. तसेच या श्लोकात आपल्या जगण्यासाठी पूर्णब्रह्म असलेले अन्न प्राप्त करून दिल्याबद्दल आपण देवाचे आणि निसर्गाचे आभार मानतो. शेवटी ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ म्हणजे- पोट भरण्यासाठी अन्न ग्रहण करणे हे जितके असंस्कारित आहे तेवढेच एक यज्ञकर्म म्हणून योग्य अन्न, योग्य प्रमाणात, योग्य मान ठेवून ग्रहण करणे हे संस्कारमय आहे. हेच खरे अन्नसंस्कार असल्याचे शास्त्रात, पुराणात सांगितले आहे. जेवण करण्यापूर्वी देव, निसर्ग तसेच अन्नाची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्याचे आभार मानावेत.
अठरा पुरणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणामध्ये जेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याचा उल्लेख आलेला आहे…
जेवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या –
१) पुराणात सांगितल्याप्रमाणे पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करावे. असे केल्याने आपल्या शरीराला अन्नाची जास्त उर्जा प्राप्त होते.
२) कधीही तुटक्या किंवा फुटक्या भांड्यांमध्ये जेवण करू नये, कारण यामुळे दुर्भाग्य वाढते.
३) पुराणानुसार दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे अशुभ मानले जाते. तसेच पश्चिम दिशेला तोंड करून जेवण केल्यास रोगांमध्ये वृद्धी होते असेही सांगण्यात आले आहे.
४) जेवण करण्यापूर्वी दोन हात, दोन पाय आणि तोंड असे पाच अवयव चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. याचे कारण असे सांगितले जाते, की जेवण करताना आपले पाय ओले असल्यास आरोग्य लाभ प्राप्त होतात तसेच आयुष्य देखील वाढते.
५) पुराणात सांगितल्यानुसार या स्थितीमध्ये जेवण करू नये
* पलंगावर बसून अथवा हातामध्ये ताट घेऊन कधीच जेवण करू नये.
* तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातसुध्दा जेवण करू नये.
* उभे राहून जेवण करू नये. नेहमी बसूनच जेवण करावे.
६) जेवणापूर्वी हा एक उपाय करा –
* जेवण करण्यापूर्वी देवी-देवतांचे तसेच अन्नपूर्ण मातेचे स्मरण करावे आणि सर्व उपाशी लोकांना अन्न मिळो अशी प्रार्थना करावी.
* कधीही ताटात वाढलेल्या अन्नाला नाव ठेऊ नये. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि ते खाल्ल्यास शरीरात कधीच उर्जा प्राप्त होत नाही.
७) जेवण करण्यापूर्वी अग्नी देवता आणि घरातील इतर देवी-देवतांनासुध्दा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास गावातील, परिसरातील मंदिरात जाऊन तेथील देवाला नैवेद्य दाखवावा.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘फूड पॉयजनिंग’ कशामुळे होते? ‘ही’ आहेत 5 लक्षणे ?
- ‘फंगल इंन्फेक्शन’ दूर करण्यासाठी ‘या’ 2 प्रकारे करा कडूलिंबाचा वापर !
- मक्याच्या कणीसाचे ‘हे’ आहेत 4 फायदे, मात्र…त्यावर पाणी पीणे नुकसानदायक
- पचनक्रिया बिघडली असेल तर आहारात ‘या’ 7 गोष्टींचा करा समावेश
- तुम्हाला ऑफिसमध्ये सतत झोप येते का? ‘ही’ 4 कारणे असू शकतात