लातूर शहरामध्ये शिवसेनेचे अभय साळुंके यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन पालक मंत्री तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांच्यावर ३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
साळुंखे म्हणाले, निलेंगकर यांनी कामगार विभागातर्फे कामगारांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये भ्रष्टाचार केला आहे. तसेच ५० हजार कामगारांची नोंदणी करुन तीन हजार कोटींचा घोटाळा केला आहे, असे साळुंखे म्हणाले. राज्यात सर्वात जास्त कामगार मुंबईत आहेत. तर, त्यापेक्षा जास्त कामगारांची नोंद निलंगा तालुक्यात कशी झाली ? असा प्रश्नही यावेळी साळुंखे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, संभाजी पाटील निलंगेकर आपल्या कार्यकर्त्यांना कामगारांच्या नावाखाली लाभ पोहचवत असल्यानं खळबळ उडाल्याचा प्रकार पोलीसनामाने समोर आणला होता. त्यातच आता निलंगेकरांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.