Lockdown : ‘रामायण’ आणि ‘महाभारत’नंतर आता ‘शक्तीमान’ची वापसी ! खुद्द ‘शक्तीमान’नंच शेअर केला ‘व्हिडीओ’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा महाभारत, रामायण अशा अनेक जुन्या मालिकांचं प्रसारण सुरू झालं आहे. अशात आणखी एका शोची वापसी होणार आहे जो 90 च्या दशकातील मुलांचा खूप फेवरेट शो होता. या मालिकेचं नाव आहे शक्तीमान. होय शक्तीमान पुन्हा एकदा टीव्हीवर वापसी करणार आहे.

शक्तीमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता मुकेश खन्ना यानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानं त्याच्या इंस्टावरून याबाबत व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं म्हटलं की, “शक्तीमानच्या सर्वच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.”

एएनयानंदेखील ट्विट करत मालिकेच्या पुन: प्रसारणाची माहिती दिली आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की, एप्रिलपासून(अर्थातच एप्रिलची सुरुवात म्हणजेच 1 एप्रिल 2020 पासून) शक्तीमान ही मालिका डीडी नॅशनलवर रोज दुपारी एक वाजता प्रसारीत केली जाणार आहे.

शक्तीमानची टीव्हीवर वापसी होणं नक्कीच ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रामायण आणि महाभारत या शोनंतर हा एक असा हिट शो होता जो खूप गाजला होता. 90 च्या दशकातील मुलं तर त्यांच्या बालपणीची ही आठवण आयुष्यभर विसरू शकत नाहीत.

28 मार्च 2020 पासून रोज महाभारत ही मालिका दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता डीडी भारतीवर रोज प्रसारीत केली जात आहे. तर शनिवार दि 28 मार्च 2020 पासून रामायण या शोचंही पुन: प्रसारण दूरदर्शनवर सुरू केलं गेलं आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड सकाळी 9 वाजता आणि दुसरा एपिसोड रात्री 9 वाजता प्रसारीत केला जात आहे.

Lockdown: ‘Shaktimaan’ returns after ‘Ramayana’ and ‘Mahabharata’! Know when and where