छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरवा पाहिजे ?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का ? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान त्यांनी उदयनराजेंना दिले. आज पुण्यात एका कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्यांनी वंशज असल्याचे पुरावे देण्याचे आव्हान दिले. संजय राऊत यांच्या या विधानावर आता भाजपचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील उडी घेतली आहे.
संजय राऊत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या विधानावर छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरवा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगावं असे शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच मी किंवा उदयनराजे, संभाजीराजे काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच हा वाद सुरु केला होता. त्यामुळे आता त्यांनी हा वाद संपवावा असे शिवेंद्रराजे यांनी सांगितले.
काय म्हणाले संजय राऊत ?
मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी उदयनराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत, भाजपचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. मात्र, एखादा महापुरूष सर्वांचा असतो. देवी देवतांची पुजा करताना त्याला कोणी विचारायला जात नाही. तसेच महापुरूषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –