Coronavirus : राज्यात दिवसभरात 2673 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाबाबत आज (रविवार) राज्यात 1622 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज राज्यात एकूण 2 हजार 673 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.67 टक्के इतके झाले आहे.

आज दिवसभरात राज्यात एकूण 30 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 51 हजार 310 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.51 टक्के इतके आहे. तर राज्यात आजपर्यंत 19 लाख 55 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.67 टक्के इतके झाले आहे.

राज्यात सध्या 35 हजार 948 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 49 लाख 77 हजार 683 प्रयोशाळा नमुन्यापैकी 20 लाख 44 हजार 071 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.65 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 1 लाख 72 हजार 311 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 979 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.