‘महाविकासआघाडी विकास करून 5 वर्षांची मॅच जिंकणारच’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या टीममध्ये सर्व दिग्गज आहेत. त्यामुळे पुढील 5 वर्षे महाराष्ट्राचा विकास करून महाविकासआघाडी ही मॅच जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. हिंदूत्व आणि शेतकऱ्यांच्या विषयावर भाजप हिवाळी अधिवेशनात वरचढ होऊ पहात आहे. आम्ही 3 टोकाचे पक्ष आहोत असं त्यांना वाटत आहे. आम्ही केलेला प्रयोग नवीन आहे. जनता याचे स्वागत करीत आहे” असंही ते म्हणाले.

आज (मंगळवार दि 17 डिसेंबर) शिवसेनेच्या दालनात सकाळी 9 वाजता महाविकासआघाडीची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर भर द्यावा अशा सूचनाही देण्यात आल्या. 5 वर्षे हे सरकार चालावे यासाठी ही बैठक होती. यात राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री जयंत पाटील, अजित पवार, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती.

बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज देशात अशांतता निर्माण केली जात आहे. विकास करण्यासंदर्भात निश्चित दिशा नसल्यानं व उत्तर नसल्यानं प्रश्न निर्माण केले जात आहे. जनतेला चिंतेत ठेवायचं, अस्वस्थ वातावरण निर्माण करण्यासाठी ठिणग्या टाकण्याचं काम होत आहे. हिंदुत्वाच्या मद्द्यावर कसं उत्तर द्यायचं हे मला चांगलं ठाऊक आहे. ते मला शिकवण्याची गरज नाही.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/