‘बॅलेट’ पेपरवर फेरनिवडणूक घ्या, आता राजीनामा देतो : खा. उदयनराजे

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – ईव्हीएम मशीनवरून देशभरात घोळ सुरु असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील विरोधकांनी देशभरात या गोष्टीवरून राळ उठवली होती. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनऐवजी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी आग्रही मागणी देखील विरोधकांनी लावून धरली आहे. त्यानंतर आता सातारा लोकसभा मदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे.यावेळी त्यांनी म्हटले आहे कि, ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या; मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या.

याविषयी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे कि, “प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु सर्वसामान्यांच्या खिशातून टॅक्‍सच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशाचा इव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर इव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच साडेचार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च इव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत. असे असताना त्या विषयातील तज्ज्ञ नसतानाही न्यायालये इव्हीएमबाबत आग्रही राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा? असेदेखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ईव्हीएम मशीनच्या वैधतेबाबत कायदेपंडितांनी जी ठामपणे विधाने केली ती कोणत्या आधारावर केली, असे विचारून ते म्हणाले, निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे. माझ्याच लोकसभा मतदार संघात वाई मतदारसंघात ३४४, कोरेगावमध्ये पाच, कऱ्हाड उत्तरमध्ये १४८, कऱ्हाड दक्षिणमध्ये पाच, पाटणमध्ये ९७, तर सातारा मतदार संघात ७५ मतांचा फरक आला आहे. अशाच प्रकारे देशातील ३७६ मतदार संघात झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आहे. निवडणूक आयोगाच्या साईटवरील माहितीतही तफावत असल्याचे स्पष्ट झाल्यावर ती माहितीच काढून टाकण्यात आली. व्हायरसमुळे माहिती गेली असे आयोग म्हणतो. मग, लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार त्यामुळेच या मतदारसंघात फेरमतदान घ्या, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/1438550962950742

आरोग्यविषयक वृत्त

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

जाणून घ्या “योगा” कधी करावा

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय

मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

सिने जगत

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या आईने वयाच्या 75 व्या वर्षी केलं ‘योगासन’