नगरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन 

बुऱ्हाणनगर येथे वर्षा साठे या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. परंतु, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृत वर्षा साठे नगर तालुक्यातील निंबोडी या ठिकाणी राहत होती. येथे ती घरकामे करुन उपजीविका करत होती.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’622347c3-ad9d-11e8-b36b-69c697833857′]

बुऱ्हाणनगर रोडवर वर्षा साठे या महिलेचा अपघात झाल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत महिलेचा ज्या ठिकाणी अपघात झाला तेथील जवळच्या शेतात रक्त आढळून आले. त्यामुळे नातेवाईकांनी यावर आक्षेप घेऊन हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप केला आहे. या अपघाताचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यासंदर्भात भिंगार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

जतमध्ये पिस्तुल जप्त, तिघांना घेतले ताब्यात