Nana Patole On BJP MLA | नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य, ”भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, जेव्हा हातोडा मारू….”
मुंबई : Nana Patole On BJP MLA | भाजपाचे अनेक आमदार आमच्या सोबत आहेत. आम्ही जेव्हा हातोडा मारू तेव्हा दिसेल. मात्र सध्या हा विषय महत्त्वाचा नाही. भारत जलाऊ पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र जाळण्याचे पाप केले. भाजपाला महाराष्ट्र जाळण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
यापूर्वीच काँग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये दाखल आहेत. कालपरवा अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानंतर, आणि त्यांना ताबडतोब राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर भाजपामधील निष्ठावंतांमध्ये नाराजीची भावना उघड झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. पटोले हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, सध्या भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र योग्य वेळी त्यावर निर्णय घेऊ. पटोले यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार सुद्धा लवकरच भाजपामध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपा नेते परिणय फुके यांनी काँग्रेसचे १६ ते १७ आमदार भाजपात प्रवेश करतील, असे म्हटले आहे. आता नाना पटोले यांनीही मोठा दावा केल्याने आगामी काळात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा