मोदींच्या ‘या’ शोधामुळे जगभरातले वैमानिक चिंतेत

एअर स्ट्राइकवरून आव्हाडांनी उडवली खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत भाष्य केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोदी विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. मोदींनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते, हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याचा विचारात तज्ज्ञ होते.

त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचवण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता. यावरून विरोधक मोदींना निशाणा साधत असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना खरमरीत टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मोदींची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे, मोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत! येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा ! अशी पोस्ट आव्हाड यांनी केली आहे.

फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये आव्हाड म्हणातात “ढगाळ वातावरणामुळे सर्जिकल स्ट्राईक नको म्हणणाऱ्या संरक्षण तज्ञांना मी सांगितले की ढगाळ वातावरणामुळे आपली विमाने रडारवर दिसणार नाहीत, आणि शत्रूला चुकवून परत येतील.”- इति श्रीयुत मोदीमोदींजींच्या या शोधामुळे जगभरातले नागरी वैमानिक चिंतेत आहेत!

ढगात जर विमान रडारवर दिसलं नाही, किंवा रेडिओ तरंग तिथे पोचलेच नाहीत तर Air Traffic Controller त्यांना योग्य दिशा, उंची आणि बाकीची आवश्यक माहिती सांगणार कशी?येत्या जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत मान्सूनमुळे देशातील सगळ्या विमानसेवा बंद ठेवाव्या लागतील बहुदा!

पण घाबरू नका! या सगळ्या प्रश्नांवर आजतकच्या अंजना ओम कश्यप (2000 च्या नोटेत चीप असणाऱ्या फेम) यांनी त्यांच्याकडील जमिनीखाली 200 फुटांवरच्या नोटा शोधणारी रडार भारत सरकारला देण्याचा वायदा केलेला आहे!-डॉ.जितेंद्र.आव्हाडमोदी मुलाखतीत काय म्हणालेहवाई हल्ल्याच्या तयारीबाबत मी नऊ वाजता माहिती घेतील… त्यानंतर पुन्हा बारा वाजता माहिती घेतली. त्यावेळेस वातावरण अचानक खराब झाले आणि ती आमच्या समोरील मोठी समस्या होती…. पाऊस खूप झाल्याने मी हैराण झालो, आत्तापर्यंत देशातील एवढे विद्वान लोक मला शिव्या घालतात त्यांचे डोकं इथ चालत नाही.

मी पहिल्यांदाच हे सांगत आहे… एका क्षणासाठी आमच्या मनात आलं अशा खराब वातावरणात आपण काय करणार… ढग जातील की नाही… त्यावेळी तज्ज्ञ तारीख बदलण्याच्या विचारात होते… त्यावेळी माझ्या मनात दोन विचार डोकावले…एक गोपनियता… आतापर्यंत सर्व गोपनिय होतं… गोपनियतेत जर काही चूक झाली तर आम्हीच काही करु शकणार नव्हतो…दुसरा विचार माझ्या मनात आला…मला सर्व विज्ञान काही समजत नाही,

पण ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय याचा आपल्याला फायदाच होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला. आपण त्यांच्या रडारपासून वाचू शकतो काय…आकाशात जमा झालेल्या ढगांचा फायदा होऊ शकतो असा माझा विचार असल्याचं मी सांगितलं…सगळे बुचकळ्यात पडले…अखेरीस मी म्हटलं…ओके जा…नंतर ते निघाले”.