तालुक्यात पुन्हा अराजक माजविण्यासाठीच विरोधकांना सत्ता हवीय, कुलांना संपविण्याची भाषा त्याचेच प्रतीक : माऊली ताकवणे
दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – दौंड तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि भाईगिरी कुणी जोपासली. सर्वसामान्य जनतेला कुणी वेठीस धरले, कुणाच्या काळात तालुक्यात अराजक माजले होते हे सर्वांना माहीत असून विरोधकांना तालुक्यात पुन्हा अराजक माजविण्यासाठी सत्ता हवीय आणि त्यासाठी त्यांना कुल अडचण ठरतायत अशी टिका माऊली ताकवणे यांनी केली आहे.
दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरीने डोके वर काढले होते यातूनच अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. कुठे गोळीबार तर कुठे घरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत होते तालुक्यात ही परिस्थिती कुणामुळे झाली होती हे जनतेला चांगले माहीत असून आ.राहुल कुल यांच्या काळामध्ये या सर्व गोष्टींना आळा बसविण्यात यश आले आहे.
तालुक्यातील गुंडगिरी, भाईगिरी संपविण्याचे काम राहुल कुल यांनी केल्यानेच आता त्यांना संपविण्याची भाषा विरोधक करत आहेत मात्र जनता सुज्ञ असून त्यांना चांगले माहीत आहे की तालुका कोण व्यवस्थित चालवू शकतो त्यामुळेच तालुक्याने कुल कुटुंबियांवर वर्षानुवर्षे विश्वास ठेवून त्यांच्याकडे तालुक्याची सूत्रे दिली आहेत आणि यापुढेही देतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला.
Visit : Policenama.com
- डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
- अनिद्रेने त्रस्त आहात ?…तर ‘हा’ रामबाण उपाय करा, इतरही आहेत अनेक फायदे
- कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या
- ‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
- ‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
- नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा
- सावधान ! ‘या’ आजारांकडे दुर्लक्ष केले तर ‘हार्ट अटॅक’ चा धोका वाढतो १७ पटीने
- महिलांनी गरोदरपणात मोबाईलचा वापर कमी करावा, अन्यथा ‘हे’ आहेत धोके !
- नैराश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खेळा ‘व्हिडिओ गेम’, ‘ही’ आहेत कारणे
- सावधान ! ‘अल्कोहोल’ मध्ये कधीही मिसळू नका ‘एनर्जी ड्रिंक्स’, हे आहेत धोके
- शांत आणि पूर्ण झोप हवी असेल तर ‘या’ ५ गोष्टी नेहमी टाळा, जाणून घ्या