नगरची जागा भाजपला मिळावी, आमचा शिवसेनेच्या ‘त्या’ उमेदवाराला विरोधच : माजी खा. गांधी
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास पाहता नगरची जागा भाजपला मिळावी, आता भावनात्मक आणि द्वेषाचे राजकारण नकोय, नगरकरांना विकास हवा आहे, कंपन्या बंद पडल्या आहेत, त्या उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यामुळे नगरची जागा भाजपला मिळावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी दिलीप गांधी म्हणाले की, युती झाली तर मागील पंचवीस वर्ष ज्यांना उमेदवारी दिली त्यांना आमचा विरोध राहणार. आम्हाला माजी आमदार अनिल राठोड चालणार नाही. त्यांना आम्ही चालत नसेल तर आम्हाला पण ते चालणार नाही. लोकसभेला मित्र पक्ष म्हणून आमच्यावर आरोप करत होते. आता आम्हाला पण ते नको आहेत.
गांधी पुढे म्हणाले की, महापालिकेत देखील भाजपची सत्ता असून नुकत्याच झालेल्या लोकसभेत भाजपला शहरातून मोठे मतधिक्य मिळाले होते. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळेल असा विश्वास दिलीप गांधी व्यक्त केला.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे