Nitesh Rane On Uddhav Thackeray | जरांगेंचे उपोषण सुटेपर्यंत का थांबला नाहीत? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : Nitesh Rane On Uddhav Thackeray | मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे जालन्यात उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आंदोलनामुळे राज्यातील स्थिती बिकट झाली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) प्रचारात व्यस्त असल्याची टीका शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आली होती. यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण ठाकरे कुटुंबियांवर टीका केली आहे. जरांगे यांचे उपोषण सुटण्याची वाट न पाहता उद्धव ठाकरे (Nitesh Rane On Uddhav Thackeray) कुटुंबासह डेहराडूनला प्रायव्हेट जेटने गेल्याचा दावा नितेश यांनी केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी म्हटले की, ठाकरे कुटुंबीय काल दुपारी २ वाजता एका खासगी विमानाने गेट नंबर ८ वरून डेहराडूनला निघून गेल्याचे मला कोणीतरी सांगितले. त्यांच्यासोबत त्यांचा कूक आणि स्टाफही आहे. हीच त्यांची मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) काळजी आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

https://x.com/NiteshNRane/status/1720281283354591350?s=20

राणे यांनी म्हटले की, जरांगे पाटलांचे उपोषण सुटेपर्यंत का थांबला नाहीत, मग जे पक्षाचे काम करणाऱ्या,
तुमच्यासारखे पिकनिकवर न जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना दोष का द्यायचा. (Nitesh Rane On Uddhav Thackeray)

नितेश यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, मला आशा आहे की आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)
अटक टाळण्यासाठी कुठे बेपत्ता होणार नाहीत. सुशांत रजपूत प्रकरणाची कोर्टात लवकरच सुनावणी सुरु होईल.
नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांचा उल्लेख बेबी पेंग्विन असा केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro News | हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी केंद्र शासनाकडून 410 कोटी