देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात, म्हणाले – ‘ठाकरे सरकारनं सद्सदविवेक बुध्दी गहाण ठेवली का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. याचा विसर या राज्य सरकारला पडला आहे. पोलीस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, ते छळवणुकीसाठी नाहीत. हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपण सदसदविवेकबुद्धी- संविधानाला स्मरुन घेतलेली शपथ गहाण ठेवली का? हा प्रश्न निर्माण होतो, असे ट्विट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर(Chief Minister Uddhav Thackeray ) हल्लाबोल केला आहे.

अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई अवैध ठरवल्याच्या न्यालयाच्या निर्णयाचे स्वागत करत फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारे आहेत. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे महाराष्ट्रद्रोही ठरविणार का?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन न देण चूक असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने आज कंगना राणौतच्या कार्यालयावरील महापालिकेची कारवाई अवैध असून नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिले. न्यायालयाच्या या दोन्ही निकालांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दोन्ही निकाल सरकारला सणसणीत चपराक…
सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडील काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे”, असेही रोखठोक मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.