‘शेतकऱ्यांना लुटणारे आता आक्रमक होताहेत’ !

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधात असलेले भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील विरोधकांना टोला लगावला आहे.

गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना लुटणारे भाजप शेतकऱ्यांच्या मुद्धावर आक्रमक झाल्याने बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले. तर शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक झाल्याचे पाहून मला आनंद होत असल्याचे देखील कडू यावेळी म्हणाले. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला पाठींबा दर्शवलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी केंद्र सरकारने राज्याचे पैसे दिले नसल्याचे सांगितले आहे आणि यावेळी फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली.

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी या मागणीसाठी भाजपनं विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं आहे. यावेळी भाजप नेत्यांच्या हातात सामनाच्या लेखात छापण्यात आलेल्या मजकूराचे बॅनरही दिसून आली. शेतकऱ्यांसाठी भाजपकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/