CM ठाकरेंचा ‘मोठा’ निर्णय ! 26 जानेवारीपासून ‘शाळां’मध्ये लागू होणार ‘हा’ नियम
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून घेण्यात आला आहे. येत्या 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परिपाठातले इतर विषय वगळण्याचाही निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची मूलतत्त्वं रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत दररोज परिपाठ होतो. या परिपाठातले विषय शाळा ठरवत असते. या परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे, असा निर्णय सरकारने घेतला आहे. एका वृत्तवाहिनीने या संबंधीचे वृत्त दिले आहे. परिपाठातले इतर विषय वगळून त्याऐवजी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केले जावे, असा आदेश सरकारने दिले आहेत. 26 जानेवारी रोजी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून 70 वर्षापूर्वी याच दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली होती.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र, तत्कालीन सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केली नव्हती. आता उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- थंडीच्या दिवसात प्या ‘आल्याचे पाणी’, होतील ‘हे’ 4 फायदे !
- ‘कापूर’ वाढवेल तुमचे आरोग्य आणि सौंदर्य ! जाणून घ्या 5 फायदे
- बटाट्याची साठवण करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
- सावधान ! ‘च्युइंगम’ चुकून गिळल्यास होऊ शकतात ‘या’ 4 गंभीर समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने हात धुवा स्वच्छ, अनेक गंभीर आजारांपासून होईल बचाव
- प्रमाणापेक्षा जास्त घाम का येतो ? जाणून घ्या 3 कारणे आणि 3 उपाय !