‘रोड’, ‘प्यार तूने क्या किया’ सारख्या सिनेमाचे दिग्दर्शक रजत मुखर्जीचं जयपूरमध्ये निधन, किडनीच्या त्रासाचं कारण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे किडनीच्या आजारामुळे जयपूरमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईत वास्तव्यास असणारे रजत मुखर्जी लॉकडाऊन काळात जयपूरमध्ये होते. दीर्घकाळापासून ते किडनीच्या आजारालाा तोंड देत होते. ’प्यार तूने क्या किया’, रोड ,उम्मीद , लव इन नेपाल यांसारख्या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.

दिग्दर्शक रजत मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे. ’माझा मित्र आणि रोडचा दिग्दर्शक रजत मुखर्जी याचा जयपूरमध्ये आजाराशी दीर्घकाळ लढताना मृत्यू झाला आहे. तुला शांती लाभो. माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे की आता आपण भेटू शकत नाही आणि पुन्हा एकदा एकत्र काम करू शकत नाही. जिथे आहेस तिथे खूश राहा’. रजत यांच्या ’रोड’ या राम गोपाल वर्माने निर्मिती केलेल्या सिनेमाचे काम लक्षात राहणारे आहे.

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाममध्ये विवेक ऑबेरॉय आणि अंतरा माळी मुख्य भूमिकेत होते. त्याचप्रमाणे 2001 मध्ये त्यांचा उर्मिला मातोंडकर, फरदीन खान आणि सोनाली कुलकर्णी स्टारर ’प्यार तूने क्या किया’ या सिनेमा प्रदर्शित झाला होता. दरम्यान काही मीडिया अहवालांच्या मते ते काही दिवसात नवीन सीरिज देखील प्रेक्षकांसाठी घेऊन येणार होते.