रायबरेलीच्या जिल्हाधिकार्‍यांची जीभ घसरली, भर सभेत CMO ला म्हणाले ‘गाढव’

रायबरेली : सरकारने भ्रष्टचार कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो पोसणारे अधिकारी भ्रष्टचाराची मुळे घट्ट पकडून बसले आहेत. रायबरेली आरोग्य विभागाचा एक भ्रष्टाचार लपवण्याचे प्रकरण मोठ्या कालावधीपासून चर्चेत आहे. यावरून कलेक्टरने सीएमओला मीटिंगमध्ये चांगलेच झापले. सर्वांसमक्ष ओरडा खाणे सीएमओच्या जिव्हारी लागले आणि त्यांनी कलेक्टरविरोधात आरोग्य महासंचालकांना पत्र लिहिले. नंतर आरोग्य संघटनांच्या मध्यस्तीनंतर प्रकरण शांत झाले, परंतु यामुळे विभागात सुरू असलेला भ्रष्टचार जनतेसमोर उघड झाला आहे.

रायबरेलीचे सीएमओ संजय शर्मा यांनी आपल्या विभागाचे उत्तर प्रदेशचे सर्वात मोठे अधिकारी म्हणजे महासंचालक वैद्यकीय आणि आरोग्य यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना गाढव म्हटले, चामडी उतरवेन, असे शब्द प्रयोग केल्याचे म्हटले आहे. हे पत्र आता वेगाने वायरल होत आहे.

सीएमओचे पत्र वायरल झाल्यानंतर प्रशासकीय गोठात खळबळ उडाली शिवाय राजकीय गोठातही खळबळ उडाली आहे. सर्वत्र सीएमओची चर्चा होत आहे. या सर्व घटनाक्रमाबाबत जेव्हा सीएमओशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अगोदर फोन उचलला नाही. नंतर त्यांनी बोलण्यास नकार देत म्हटले की, बोलण्यासाठी ऑफिस योग्य जागा नाही.

सूत्रांनुसार जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांनी जिल्ह्यात येताच वेगवेगळ्या विभागाच्या अधिकार्‍यांसोबत बैठकीत बेजबाबदार अधिकार्‍यांना सुधारण्याची तंबी दिली. रायबरेली कोरोनाची प्रकरणे सतत वाढत असल्याने त्यांनी आरोग्य कर्मचार्‍यांची मीटिंग बोलावली होती, जेथे त्यांनी सीएमओला सुधारण्याचा सल्ला दिला होता. जिल्ह्यात टाइम सेंटर्समध्ये जेवणाचे काम सांभाळणार्‍या डॉक्टरची गैरहजेरी सुद्धा मीटिंगमध्ये समजली. यामुळे जिल्हाधिकारी प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी यासाठी सीएमओला फटकारले.

त्यांनी स्पष्ट म्हटले की, जे होत होते, आता तसे होणार नाही आणि सर्वांनी सुधारण्याची गरज आहे, अन्यथा सर्वांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांना नुकतेच केंद्र सरकारकडून भूजल कार्यायासाठी सन्मानित केले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात डॉक्टरांच्या संघटनेने आपल्या विभागाचा वरिष्ठ अधिकारी सीएमओची बाजू न घेता जिल्हाधिकार्‍यांना साथ दिली आहे.