नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने परिस्थितीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. शरद पवार स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेत आहेत.
राज्यात निवडणूका पार पडल्यानंतर शरद पवार तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. एकीकडे सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत जुंपली असताना, दुसरीकडे शरद पवार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. इगतपुरीत परतीच्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शरद पवार या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये पोहचले आहेत. यानंतर आता शेतकरी शरद पवारांना आपल्या व्यथा सांगत आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतू पाहणीसाठी सरकारकडून अजून कोणीही आले नाहीत, असे देखील शेतकऱ्यांनी पवारांना सांगितले.
परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना भेट दिली. पावसात पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा जाणून घेतल्या. pic.twitter.com/T33aU9p5jp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 1, 2019
यावेळी पाहणीदरम्यान पवारांनी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली, प्रशासनाने जिरायत आणि बागायत असा फरक न करता सरसकट बागायती समजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत करावी असे पवारांनी अधिकाऱ्यांना सुचवले. नाशिकच्या दौऱ्यावर पवारांसह स्थानिक आमदार देखील आहेत.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या