शरद पवार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने परिस्थितीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. शरद पवार स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेत आहेत.

राज्यात निवडणूका पार पडल्यानंतर शरद पवार तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. एकीकडे सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत जुंपली असताना, दुसरीकडे शरद पवार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. इगतपुरीत परतीच्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शरद पवार या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये पोहचले आहेत. यानंतर आता शेतकरी शरद पवारांना आपल्या व्यथा सांगत आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतू पाहणीसाठी सरकारकडून अजून कोणीही आले नाहीत, असे देखील शेतकऱ्यांनी पवारांना सांगितले.

यावेळी पाहणीदरम्यान पवारांनी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली, प्रशासनाने जिरायत आणि बागायत असा फरक न करता सरसकट बागायती समजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत करावी असे पवारांनी अधिकाऱ्यांना सुचवले. नाशिकच्या दौऱ्यावर पवारांसह स्थानिक आमदार देखील आहेत.

Visit : Policenama.com