मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राला नवं सरकार मिळतंय, परंतू आता आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात मुख्यमंत्री बनणार तर तो शिवसेनेचाच असे म्हणणाऱ्या संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यसभेत पाकिस्तान विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना राज्यसभेचा खासदार असलेल्या संजय राऊतांना सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मोदी सरकारने काही महिन्यांपूर्वी कलम 370 हे जम्मू काश्मीरमधून रद्द केल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती.
यावेळी संजय राऊत राज्यसभेत म्हणाले होते, कलम 370 हटविणे म्हणजे एका भस्मासूराचा वध केल्यासारखे असून एका सैतानाला मारण्यासारखे आहे. गेल्या 70 वर्षांपासून आपला देश एक डाग घेऊन चालत होता. तो डाग आज धुवून निघाला आहे. अमित शहांना आमचा पाठिंबा आहे.
या भाष्यानंतर राऊत यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे ओळखून संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता 11 जवान सुरक्षा देतील.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय