Rajasthan High Court | प्यार किया तो डरना क्या ? हायकोर्टाने म्हटले – ‘लव्ह मॅरेज केलंय तर समाजाचा सामना करण्याचे धाडससुद्धा दाखवा’
जोधपूर : वृत्त संस्था – लव्ह मॅरेज (Love Marriage) केल्यानंतर आपल्याच माणसांकडून असलेल्या धोक्याच्या प्रकरणात राजस्थान हायकोर्टने (Rajasthan High Court) विशेष भाष्य केले आहे. कोर्टाने प्रेमी युगुलला (Loving Couple) म्हटले की, तुम्ही लग्न केले आहे तर समाजाचा सामना करण्याचे धाडस सुद्धा दाखवा. प्रकरण हे आहे की, जोधपुर जिल्ह्यातील एका प्रेमी युगुलाने लव्ह मॅरेजनंतर (Love Marriage Jodhpur) पोलीस सुरक्षेच्या मागणीवरून राजस्थान हायकोर्टात (Rajasthan High Court) धाव घेतली.
कोर्टाने सुरक्षा पुरवण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळली. सोबतच कोर्टाने भाष्य केले की, जर तरूण-तरूणीने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांच्यात समाजाचा सामना करणे आणि कुटुंबाला त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत समजावण्याची दृढता असावी.
जोधपुर जिल्ह्यातील 21 वर्षीय युवक आणि 18 वर्षीय युवतीने प्रेमविवाह केला होता. यानंतर त्यांनी पोलीस सुरक्षेसाठी हायकोर्टात याचिका केली. कोर्टाने म्हटले की, पुरावे पाहून वाटत नाही की तरूण-तरूणीचे जीवन धोक्यात आहे. (Rajasthan High Court)
प्रकरण असा कोणताही पुरवा मिळाला नाही, ज्यावरून हे वाटेल की त्यांच्यावर हल्ल्याची शक्यता आहे. कोर्टाने म्हटले की, कोट एखाद्या योग्य प्रकरणात जोडप्याला सुरक्षा उपलब्ध करू शकते.
Web Title : Rajasthan High Court | jodhpur high court s remark if love marriage then muster courage to face society
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च
Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश