नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतल्या राम मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. मंदिराच्या बंधकामासाठी फक्त दगडाचा वापर केला जाणार आहे. याबाबतची माहिती श्री राम जन्मभुमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. दगडांनी बांधलेले मंदिर हजार वर्षाहून अधिक काळ राहील, असं चंपत राय यांचे म्हणणे आहे. चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी देखील आहेत. मंदिर बांधकाम प्रक्रियेत आयआयटी-चेन्नई आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्थेच्या (CBRI) सदस्यांशीही सल्लामसलत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भूमीपूजनाचा सोहळा झाल्यानंतर मंदिराच्या कामाची पुढची लगबग सुरु झाली आहे. आज मंदिर ट्रस्टची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. त्यानंतर ट्रस्टच्या वतीनं काही महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. भारताच्या प्राचीन शैलीचा वापर करून हे मंदिर उभारलं जाणार आहे. जेणेकरुन ते अधिक वर्षे मजबुतीने टिकेल. एल अँड टी कंपनीकडे या बांधकामाची जबाबदारी आहे. सध्या एल अँड टीचे इंजिनीअर हे आयआयटी चेन्नईच्या काही संशोधकांसह माती परीक्षणाचं काम सुरु करत असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली.
मन्दिर निर्माण में लगने वाले पत्थरों को जोड़ने के लिए तांबे की पत्तियों का उपयोग किया जाएगा। निर्माण हेतु 18इंच लम्बी, 3mm गहरी,30 mm चौड़ी 10,000 पत्तियों की आवश्यकता होगी। तीर्थ क्षेत्र श्रीरामभक्तों का आह्वान करता है कि तांबे की पत्तियां दान करें:श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र pic.twitter.com/RnS4sgz7WR
— ANI_HindiNews (@AHindinews) August 20, 2020
कधीपर्यंत पूर्ण होणार मंदिर ?
या मंदिराच्या भूमीपूजनचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिर कधीपर्यंत पूर्ण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले की, 36 ते 40 महिन्याचा कालावधी बांधकाम पूर्ण होण्यास लागू शकतो. त्यांच्या विधानावरून साधारणपणे 2024 च्या निवडणुकांच्या आधी या मंदिराचं काम पूर्ण होऊ शकतं असे दिसून येत आहेत.
मंदिरासाठी तांब्याच्या प्लेट
या मंदिराच्या बांधकामात तांब्याच्या प्लेटचाही वापर केला जाणार आहे. या कामात 18 इंच लांब, 3 मिलीमीटर जाडी आणि 30 मिलीमीटर रुंद अशा 10 हजार तांब्याच्या प्लेटची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे याच मापाच्या तांब्याच्या प्लेट लोकांनी दान कराव्यात, असे आवाहन ट्रस्टने राम भक्तांना केले आहे. या तांब्याच्या पट्ट्यांवर दान करणारे आपल्या परिवाराचं, क्षेत्राचं किंवा परिसरातल्या मंदिराचं नावही कोरुन पाठवू शकतात. देशभरातून अशा ताम्रपट्ट्या एकत्रित झाल्यास ते भारताच्या एकात्मतेचंही उदाहरण ठरेल, असे ट्रस्टने म्हटले आहे. शिवाय त्या निमित्ताने मंदिर निर्मितीच्या कामात योगदान दिलं जाऊ शकतं, असेही ट्रस्टने म्हटले आहे.